कविता संग्रह 002 | 01. नाते जपतांना | 02. शोध संपणार कधी? | 03. तू यावे आयुष्यात.. | 04. सुधारणार कधी?
Posted by Er Aniket B Modake नाते जपतांना.. हलकासा धक्का काय बसतो खटकण ! काचेला तडा जातो.. मनाचही अगदी तसंच ! तोच तडा ! मनालाही जातो स्वतःला सवरण्या आधीच मन विखुरलं जातं तुकड्या तुकड्यात ! काही कळण्याआधीच नाती गोती सारं संपत जातं विखुरलेल्या त्या काचेच्या तुकड्याप्रमाने.. गोळा करायचं म्हटलं तर ! अनवाणी हाताने शक्य होत नाही ते विखुरलले तुकडे हाताला जखमा द्यायला लागतात होणारा त्रास विसरुन ! कितीही एकत्र बांधून ठेवले हे विखुरलेले तुकडे तरी ते टोचनारच कधी ना कधी म्हणून मग द्यायचे का फेकून? फक्त काच असती तर नक्कीच ! पण हे फक्त काचेचे तुकडे नाहीत बंध आहेत धागे आहेत प्रेमाचे फक्त तीक्ष्ण झालेत ! सुई च्या धारदार टोकाप्रमाने.. मला खात्री आहे नात्याचे हे धारदार तुकडे ! बदलतील एक दिवस ! मऊ आणि कोमल फुलांमध्ये.. ऊन वारा आणि पाऊस झेलत झेलत झाडा च्या विखुरलेल्या बियाप्रमाने ! येतील एकत्र गहनरुपी बदलत्या वेळेसोबत.. फुटेल कुठेतरी ! नात्यालाही मायेचा अंकुर परत एकदा होईल नात्यांची गर्दी त्या बागेतील रोपट्यांसारखी ! एकत्रित आणि एकसंघ अशी.... ------------------------------------------------------ शोध संपण...
Comments
Post a Comment